उदगाव-अंकली टोलनाक्यावर २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांच्यासहित ३८ जणांची जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली. खासदार शेट्टी यांच्यासहित ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ नोव्हेंबर २०१२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना इंदापूर येथे अटक करण्यात आली होती. या वेळी उदगाव येथील टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर-सांगली महामार्ग रोखून चक्का जाम आंदोलन केले होते. या वेळी टोलनाक्याची तोडफोड करून रास्ता रोको केल्याप्रकरणी खासदार शेट्टी यांच्यासहित ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खासदार राजू शेट्टी, सागर चिप्परगे, शैलेश चौगुले, सागर मादनाईक यांच्यासह ३८ जणांची जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी अ‍ॅड. राजू कागवाडे, अ‍ॅड. पी. डी. मगदूम, अ‍ॅड. पी. ए. आणुजे, अ‍ॅड. एस. टी. चौगुले, अ‍ॅड. सचिन चौगुले यांनी याबाबत काम पाहिले. तसेच जयसिंगपूर बार असोसिएशनचे सहकार्य लाभले.

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty sugarcane agitation
First published on: 25-06-2016 at 00:05 IST