ऊस शेतीच्या माध्यमातून शिरोळ तालुका हा राज्यातील सर्वाधिक कर्करोग रुग्णांचा जिल्हा बनला आहे, असे विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी त्या विरोधात जोरदार आक्षेप नोंदवला आहे.पुणे येथे काल राज्यस्तरीय नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील मुबलक उसाचे पीक घेतले जाते. त्यासाठी पाणी, रासायनिक खत याचा मुबलक वापर केला जातो. त्याचे घटक हळूहळू पाण्याच्या स्त्रोतांत मिसळले जातात. हे पाणी पिल्याने शिरोळ तालुक्यात राज्यात सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आढळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याला जोरदार आक्षेप घेतला जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी , चंद्रकांत पाटील यांनी असे विधान करण्यापूर्वी राहुरी कृषी विद्यापीठात शिकवणी घ्यावी किंवा रेशीम बागेत जाऊन एखादा लघुकालीन अभ्यासक्रम शिकावा,असा टोला लगावला. पंचगंगा नदीमध्ये औद्योगिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे पाणी पिण्यात वापरल्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या रुग्णांना कर्करोग झाला आहे. दूधगंगा ,वारणा, कृष्णा नदीकाठी कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. हे रायचूर विद्यापीठातील जागतिक स्तराच्या प्रयोगशाळेत तपासणीत दिसून आले आहे, हे मंत्र्यांनी समजून घ्यावे,अशी टीका त्यांनी केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Through sugarcane farming shirol taluka is the district with the highest number of cancer patients in the state amy
First published on: 07-10-2022 at 21:57 IST