लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाला वळीव पावसाने झोडपून काढले. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी गाऱ्यांसह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. कडक उन्हामुळे लाहीलाही झालेल्या लोकांना या पावसात चिंब भिजत गारव्याची अनुभूती घेतली.

It is feared that most of the villages will be affected by the development projects in Thane district even during the rainy season
ठाणे जिल्ह्यात ‘समृद्धी’ने पुराची अवकळा
Wife, Karmala, murder, husband arrested,
सोलापूर : करमाळ्यात माहेरी राहणाऱ्या पत्नीचा सुपारी देऊन खून, पतीसह सहाजण अटकेत
Heavy rain, Vasai, Flooding,
वसईत पावसाची संतधार सुरूच, नदीनाल्यांना पूर; पांढरतारा पाण्याखाली
Nashik, ATM, thieves, Satana taluka,
नाशिक : सटाणा तालुक्यातील एटीएम चोर ग्रामस्थांमुळे पोलिसांच्या ताब्यात
Nine persons trapped in flood water in Awar were rescued by the teams of Natural Disaster Prevention Department
बुलढाणा : खामगावात अतिवृष्टीचे तांडव; आवार मध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पुराने वेढलेल्या नऊ व्यक्ती…
Nashik, Woman Dies in Surgana, Woman Dies in Surgana tehsil due to Flood, Farmers Await Heavy Rains for Sowing in nashik, rain, monsoon, rain in nashik, nashik farmers, nashik news,
नाशिक : सुरगाण्यात पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, घाटमाथ्यावर पावसाची हजेरी
Chandrapur, Brutal Ax Murder, Brutal Murder, Electric Wire Dispute, Brutal Ax Murder Over Electric Wire Dispute , murder in hadli village, Father and Son Arrested for Brutal Ax Murder, mul tehsil, chandrapur news,
चंद्रपूर : वीजतारांच्या वादात बाप-लेकाने शेजाऱ्याचे धड केले शिरावेगळे….
buffalo 24 buffaloes got electrocuted and died on the spot
ओढ्यात उतरलेल्या २४ म्हशींचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यहात हवेत अधिक उष्मा जाणवत होता. रखरखीत उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीस होत होता. अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. एखादा जोरदार वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती. बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुख:द धक्का मिळाला. आज उष्मा वाढल्याने दुपारच्या वेळी तर रस्ते ओस पडले होते. सायंकाळी चार नंतर वादळी वारा, गारपिटाबरोबरच वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. पाठोपाठ हवेत गारवा निर्माण झाला. पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला.

आणखी वाचा-नग्न फोटो पाठव, अन्यथा ठार करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

बाजारात तारांबळ

शिरोळ शहरातील श्री बुवाफन मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते व्यापारी ग्राहकांची अक्षरशः तारांबळ उडाली.पाऊस होणे गरजेचे असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला. बालचमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या स्वागत केले. अनेक जण टपोऱ्या गारा वेचण्यात मग्न झाले होते.

पिकांना दिलासा

हा पाऊस ऊस, मक्का, हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे. हरभरा, ज्वारी, गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती. एप्रिल मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत.