१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने Sepak Takraw या खेळात ऐतिहासीक कांस्यपदकाची कमाई केली आहे. पालेमबंग येथे झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत भारताला थायलंडकडून ०-२ ने पराभव स्विकारावा लागला. मात्र उपांत्य फेरीत पोहचल्याप्रकरणी भारतीय चमूला कांस्यपदक देण्यात आलं. पहिल्या साखळी सामन्यात भारताने इराणचा २१-१६, १९-२१, २१-१७ असं पराभूत केलं. सध्या भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.