विंडिजविरुद्धचा भारताचा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गयाना येथे दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानाच्या बऱ्याच भागावर पाणी साचले होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला सुरुवातही झाली होती, मात्र तिसऱ्यांदा पावसाने हजेरी लावल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन्ही पंचांनी सामना रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर आता दुसरा सामना रविवारी होणार आहे. त्या दरम्यान पांड्या बंधूंनी कॅरिओकेचा आनंद लुटला. भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी २० मालिका ३-० अशी खिशात घातली. यातील पहिले दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होते. तर तिसरा सामना गयाना येथे झाला. तीनही सामने भारताने जिंकले आणि मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या मालिकेत कृणालला टी २० संघात स्थान मिळाले होते, तर दुखापतीमुळे हार्दिक पांड्या या दौऱ्यातील एकाही संघात मिळू शकलेले नाही. भारताची टी २० मालिका संपली असल्याने आता दोघांकडेही मोकळा वेळ आहे. या मालिकेत ३ बळी आणि ६७ धावा केल्या. टी २० मालिका संपवून कृणाल मायदेशी परतला. त्यामुळे या दोघांनी कॅरिओकेचा आनंद घेत 'व्हाय धिस कोलावरी डी' या गाण्यावर सूर लावला आहे. Why this Kolaveri Kolaveri Kolaveri Di at the Pandya music studio @hardikpandya7 pic.twitter.com/Ja6cBFkFGH — Krunal Pandya (@krunalpandya24) August 10, 2019 आठ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकुळ घातलेले 'व्हाय धिस कोलावरी डी' हे गाणं पांड्या बंधूंनी गायलं. हार्दिक आणि कृणाल यांनी त्यांच्या मित्रांसोबत एक पार्टी आयोजित केली होती. त्यात पांड्या बंधुंनी कॅरिओके सेशनमध्ये सहभाग घेतला. कृणाल व हार्दिक या पांड्या बंधुंची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यात या दोघांनी 'कोलावरी डी' हे गाणं गायलं. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.