Sourav Ganguly Statement on Pitch : विशाखापट्टणम कसोटी सामन्यादरम्यान माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. आपल्या पोस्टमध्ये गांगुलीने भारतीय खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर का खेळत आहोत, असा सवालही त्यांनी केला आहे.फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळून फलंदाजीचा दर्जा नष्ट होत असल्याची कबुली सौरव गांगुलीने दिली आहे. गांगुलीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

सौरव गांगुलीने पोस्टमध्ये लिहले, “जेव्हा मी बुमराह शमी सिराज मुकेशला गोलंदाजी करताना पाहतो. मला आश्चर्य वाटते की, आम्हाला भारतात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टी का तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक सामन्यात चांगल्या विकेट्सवर खेळण्याचा माझा विश्वास दृढ होत आहे. अश्विन जडेजा, कुलदीप आणि अक्षर यांच्या बरोबरीने ते कोणत्याही खेळपट्टीवर २० विकेट्स घेतील. मागील ६ ते ७ वर्षात घरच्या मैदानावरील खेळपट्ट्यांमुळे फलंदाजीचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे खेळपट्ट्या चांगल्या असणे खूप महत्त्वाचे आहे. तरी देखील भारत पाच दिवसात जिंकेल.”

India Becomes First Team in 21st Century to Declared the First Innings under 35 overs in IND vs BAN Kanpur Test
IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
IND vs BAN Rohit Sharma Take Bold Decision After Winning Toss to Bowl First in India After 9 Years Kanpur Test
IND vs BAN: रोहित शर्माचा दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत चकित करणारा निर्णय, ९ वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
IND vs BAN Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record
IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding video viral
IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू

वास्तविक, पहिल्या कसोटीत भारताचा इंग्लंडकडून २८ धावांनी पराभव झाला होता. हैदराबादच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंनाही मदत मिळाली पण त्यानंतरही भारतीय फलंदाजांना इंग्लिश फिरकी गोलंदाजांचा चांगला सामना करता आला नाही. त्यामुळे १९० धावांची आघाडी घेतल्यानंतरही भारताला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत गांगुलीने वळणावळणाच्या खेळपट्टीवर कसोटी सामने खेळण्याबाबत आपले मत मांडले आहे.

हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम यॉर्करवर ऑली पोप झाला क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना खूप त्रास दिला आणि महत्त्वपूर्ण ६ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना फारसे महत्त्व न दिल्याबद्दल गांगुलीने एका पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.