रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात टीम इंडियाने मोठ्या मुश्किलीने ६ गडी राखून विजय मिळवला. पण सामन्यानंतर लखनऊमधील खेळपट्टी आणि सामन्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीने दोन्ही संघांचे कर्णधारही हैराण झाले होते. या टी-२० सामन्यात एकही षटकार दिसला नाही हे देखील आश्चर्यकारक होते.

लखनऊमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानेही १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपले ४ फलंदाज बाद गमावले. अशा प्रकारची खेळपट्टी भारतातील कोणत्याही टी-२० सामन्यात क्वचितच पाहायला मिळते, जिथे फलंदाज प्रत्येक धावांसाठी धडपडताना दिसतात.

Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
RR vs GT Match Updates Dhanshree Verma wished her husband Yuzvendra Chahal who played 150th IPL Match
RR vs GT : धनश्री वर्माने १५०वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलला दिल्या खास शुभेच्छा, VIDEO होतोय व्हायरल
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

सामन्यात एकही षटकार मारला गेला नाही –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यातही एक विक्रम झाला, या सामन्यात २३९ चेंडू टाकले गेले आणि एकही षटकार मारला गेला नाही. कोणत्याही टी-२० सामन्यातील अशा प्रकारची ही पाचवी मोठी घटना ठरली. यादरम्यान सामन्यात १६ फलंदाजांनी फलंदाजी केली, ज्यांनी केवळ १८३ धावा केल्या. संपूर्ण सामन्यात केवळ १४ चौकार मारले गेले.

हेही वाचा – IND vs NZ: भुवनेश्वरला मागे टाकत युझवेंद्र चहलचा नवा विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणार ठरला पहिलाच भारतीय

एकही षटकार न लागवलेले सामने –

गॉर्नसी विरुद्ध जर्सी, १९ फलंदाज, २४३ चेंडू
गॉर्नसी विरुद्ध जर्सी, १६ फलंदाज, २४३ चेंडू
हाँगकाँग विरुद्ध युगांडा, १९ फलंदाज, २४३ चेंडू
केनिया विरुद्ध आयर्लंड, २० फलंदाज, २४० चेंडू
भारत विरुद्ध न्यूझीलंड, १६ फलंदाज, २३९ चेंडू

खेळपट्टीबद्दल प्रश्न उपस्थित –

चाहत्यांबरोबरच कर्णधार हार्दिक पांड्यानेही लखनऊच्या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, ”खरे सांगायचे तर ती चकित करणारी खेळपट्टी होती. आम्ही दोन्ही सामने खेळलो आहोत, दोन्हीमध्ये असेच होते. कठीण खेळपट्टीवर खेळायला माझी हरकत नाही, मी त्यासाठी तयार आहे. पण या खेळपट्ट्या टी-२० सामन्यांसाठी नव्हत्या.”

हेही वाचा – IND vs NZ 2nd T20: वॉशिंग्टनच्या धावबादवर सामन्यानंतर सूर्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला,’मी चेंडू …’

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, ”जिथे सामने होत असतील तिथे खेळपट्टी अगोदरच तयार करावी. जेणेकरून सामन्याच्या दिवसापर्यंत खेळपट्टी तयार करता येईल आणि त्यांना वेळ मिळेल.” केवळ हार्दिक पांड्याच नाही तर इतर अनेक तज्ञ आणि चाहत्यांनीही ही खेळपट्टी टी-२० साठी योग्य नाही असे म्हटले आहे.