भारतीय संघाने शनिवारी (१७ डिसेंबर) अंधांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. त्याने सलग दोनवेळा स्पर्धेची अंतिम फेरी जिंकली आहे. टीम इंडियाने हा सामना १२० धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी दोन गडी बाद २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २० षटकांत ३ गडी गमावून १५७ धावाच करू शकला.

भारतीय संघाने यापूर्वी २०१२ आणि २०१७ मध्येही ही स्पर्धा जिंकली होती. या सामन्यात टीम इंडियाला दोन शतके लागली. सुनील रमेशने ६३ चेंडूत १३६ धावांची खेळी केली. त्याचवेळी कर्णधार अजय रेड्डीने ५० चेंडूत १०० धावा केल्या. बांगलादेशबद्दल बोलायचे झाले तर फक्त सलमानच आपल्या बॅटने अप्रतिम दाखवू शकला. त्याने ६६ चेंडूत ७७ धावा केल्या. सलमानला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही.

match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

६ संघांमध्ये नंबर १ टीम इंडिया

५ डिसेंबरपासून ६ देशांदरम्यान सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. टीम इंडियाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा २०७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी बांगलादेशने दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव केला.

विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली

या विश्वचषकाच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे. २०१२ मध्ये प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि त्यात भारताने विजेतेपद पटकावले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत, टीम इंडिया बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये चॅम्पियन बनली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. आता २०२२ मध्ये भारताने या स्पर्धेत आपली हॅटट्रिकही पूर्ण केली आहे.

हेही वाचा:   FIFA WC: ब्राझीलच्या नेमारचे थेट भारत कनेक्शन! पाठिंब्याबद्दल केरळच्या चाहत्यांचे मानले आभार, Video व्हायरल

व्ही राव आणि एल मीणा यांनी फलंदाजीत ठरले अपयशी

व्ही राव आणि सुनील रमेश यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. १२ चेंडूत १० धावा करून रावला सलमानने बाद केले. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या एल मीणाला खातेही उघडता आले नाही आणि तीन चेंडूंचा सामना करून तो तंबूत परतला. त्याला सलमानने त्रिफळाचीत केले. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार अजय रेड्डी आणि व्ही राव यांनी डाव सांभाळला. दोघांनीही स्फोटक फलंदाजी केली आणि ते शेवटपर्यंत बाद झाले नाहीत.