Virat Kohli Received Surprise Message From Harbhajan Singh Daughter: रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. विराट कोहलीने एकट्याच्या बळावर संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान विराट कोहलीच्या कामगिरीसह त्याचा चाहतावर्गही मोठ्या प्रामाणात आहे. विराटची एक छोटीशी चाहती म्हणजे हरभजन सिंगची लेक. हरभजनच्या लेकीने विराटला त्याच्या कसोटी निवृत्तीनंतर मेसेज केला होता.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यादरम्यान, त्याने त्याची मुलगी आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल एक खुलासा केला. हरभजनने विराट कोहली आणि त्याच्या लेकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे सांगितलं.

विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटला निरोप का दिला यामागचं कारण सर्वांना जाणून घ्यायचं होतं. हरभजनलाही हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि त्याने सोशल मीडियावर विराटच्या निवृत्तीमागचं विचारण्यासाठी पोस्टही शेअर केली. फक्त हरभजनच नाही तर कोहलीच्या निवृत्तीमुळे त्याची मुलगी हिनायाही दुःखी झाली.

हिनायाने तिच्या वडिलांना याबद्दल विचारले पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही. मग हिनायाने थेट कोहलीला मेसेज करून त्याच्या निवृत्तीचे कारण विचारले. हरभजनने त्याच्या मुलाखतीत म्हटलं की, “मी ट्विट करून त्याला विचारलं विराट का? तू कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतलीस? माझ्या मुलीनेही मला विचारलं, ‘बाबा, विराट का निवृत्त झाला?’ इतकंच काय तर तिने विराटला मेसेज करून म्हटलं, ‘मी हिनाया बोलतेय, विराट, तू निवृत्ती का घेतलीस?’ विराट ही मेसेज पाहून क्षणभर थबकला. त्याने हसत तिला उत्तर दिलं, बाळा, आता मी निवृत्त होण्याची वेळ आली आहे.”

इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीने कसोटी निवृत्तीची घोषणा केली. त्याने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा करून या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. एकेकाळी त्याची सरासरी ५४ च्या जवळपास होती. पण गेल्या काही वर्षांपासून तो कसोटीत धावा करण्यासाठी सतत संघर्ष करत होता. तर तो न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला, ज्यामुळे त्याची सरासरी ४६ पर्यंत घसरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या विराट कोहली असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आय़पीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आयपीएल प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना आज म्हणजेच २९ मे रोजी पंजाब किंग्सविरूद्ध खेळणार आहे. आजचा सामना जिंकल्यास आरसीबीचा संघ थेट फायनलमध्ये पोहचू शकतो.