गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अखेर आज आयसीसीने मान्यता दिली आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत ९ संघ सहभागी होतील. स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यामध्ये सहा मालिकांचा समावेश असेल. ऑकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

वन-डे सामन्यांप्रमाणेच आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा आराखडा असेल, असं आयसीसीने स्पष्ट केलंय. कसोटी क्रिकेट क्रमवारीतले पहिले ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील. यातील ३ मालिका या घरच्या मैदानावर तर ३ मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळवल्या जातील. यात प्रत्येक संघाला दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून गरजेनूसार मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते. झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, आयर्लंड या देशांना स्पर्धेतून वगळण्यात आलेलं आहे.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

याचसोबत २०२० पासून आयसीसीने वन-डे सामन्यांची लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत लीगमध्ये खेळणारे सर्व संघ विश्वचषकात थेट पात्र होण्यासाठी आमनेसामने असतील. २०२३ साली होणाऱ्या वन-डे विश्वचषक लक्षात घेता, दर दोन वर्षांनी वन-डे लीग खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे. यानंतर दर तीन वर्षांनी ही लीग खेळवण्यात येईल. या लीगमध्येही प्रत्येक संघाला ८ मालिका खेळाव्या लागणार असून, ४ मालिका या घरच्या मैदानावर तर ४ मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. एका वन-डे मालिकेत जास्तीत जास्त ३ वन-डे सामने खेळवण्याची अट असणार आहे.

या नवीन लीगमुळे क्रिकेट रसिकांना अधिक चांगल्या पद्धतीने खेळाचा आनंद घेता येणार आहे. याचसोबत या लीगमधून विश्वचषकाला पात्र होता येणार असल्याने या स्पर्धेला वेगळचं महत्व प्राप्त होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आयसीसी सध्या प्रायोगिक तत्वावर ४ दिवसांचे कसोटी सामने आयोजित करणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे या देशांत ही ४ दिवसांचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ४ दिवसांच्या कसोटी सामन्यांमुळे नवीन संघांना कसोटी खेळण्याची अधिक संधी मिळणार असल्याचे आयसीसीचे सीईओ डेव्हीड रिचर्डसन यांनी सांगितले. त्यामुळे आता आयसीसीच्या या नवीन स्पर्धेला क्रीडा रसिक कसा प्रतिसाद देतात, हे पहावं लागणार आहे.