भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघ २०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे आणि त्यामुळेच या संघावर आणि या संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पुन्हा टीकाही ठीक, पण आता बाबरने कर्णधारपद सोडावे, अशी विधानेही आता समोर येत आहेत.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू कामरान अकमल आणि युनूस खान यांना वाटते की बाबर आझमने २०२२ च्या आयसीसी टी२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडले पाहिजे आणि एक खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीवर अधिक चांगले लक्ष केंद्रित केले पाहिजे. या दोघांचा असा विश्वास होता की बाबर आझम एक नेता म्हणून आपल्या संघाचे नेतृत्व करण्यात अयशस्वी ठरला आणि त्यामुळेच त्याने कर्णधारपद सोडले.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना कामरान अकमल म्हणाला, “मोठा भाऊ असल्याने बाबरने मला समजून घेतले किंवा पीसीबीने माझे मत एकूण घेतले, तर मला असे वाटते आहे की बाबरने या विश्वचषकानंतर कर्णधार म्हणून राजीनामा द्यावा आणि आपल्या फलंदाजीकडे लक्ष द्यावे. फलंदाजीत त्याला जर २२.०००-२५००० धावा करायच्या असतील तर त्याला खेळाडू म्हणून खेळावे लागेल. तसे झाले नाही तर त्याच्यावर इतके दडपण येईल की त्याची कामगिरी आणखी खालावत जाईल. बाबरला जर हे समजले तर त्याने कुठलाही अधिकच विचार न करता कर्णधारपदावरून पायउतार व्हावे. तो खेळाडू म्हणून खेळला तर विराट कोहलीप्रमाणे तोही क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेन.”

हेही वाचा :   T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा नेदरलॅंड्सवर ६ गडी राखून विजय, शादाब-रिझवानची चमकदार कामगिरी

त्याच वेळी, युनूस खाननेही कामरान अकमलच्या मताचा प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “प्रत्येकजण जन्मजात नेता नसतो, तर काही जणांना नेता होण्यासाठी तयार केले जाते. बघा, एखादी चूक असते जी तुम्ही कधी कधी करता पण तीच चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करता तेव्हा ती तुमची सवय होऊन जाते. नेतृत्वाची गुणवत्ता प्रत्येकामध्ये नसते, त्यामुळे बाबरने कर्णधारपद सोडून खेळाडू म्हणून खेळावे, असे मला वाटते.”

हेही वाचा :   T20 World Cup: ‘आता सध्या पंतची गरज आहे कार्तिकचे…’, कपिल देव यांचे दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, या दोन माजी क्रिकेटपटूंच्या या वक्तव्याचा बाबर आझमवर काही परिणाम होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्या तरी पाकिस्तान टी२० मधील उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून चाहत्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करेन.