बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रविवारी (४ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याचा हा निर्णय अतिशय योग्य ठरल्याचे दिसले, कारण भारताने पहिल्या चार विकेट १००च्या आतच गमावल्या. केएल राहुल याने ७३ धावा केल्याने भारताने ४१.२ षटकात सर्वबाद १८६ धावसंख्या उभारली.

टीम इंडियाची फलंदाजीला यजमानांच्या गोलंदाजांनी सपशेल खोटे ठरवत अवघ्या १८६ धावांत सर्वबाद करत रोखले. आम्ही फक्त कागदावर ताकदवान आहोत असेच चित्र आजच्या सामन्यातून समोर आले आहे. यावेळी बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन यांची गोलंदाजी प्रभावशाली ठरली. त्याने भारताच्या डावाच्या ११व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्या विकेट घेतल्या. यामुळे संघ अडचणीत आला. रोहित २७ आणि विराट ९ धावा करत बाद झाले. त्याचबरोबर भारताने पहिली विकेट शिखर धवन याची गमावली. तो ५.२ षटकात मेहदी हसन मिराज याचा बळी ठरला. हसनने धवनला ७ धावांवर असताना त्रिफळाचीत केले.

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

शाकिबने १० षटकात ३६ धावा देत ५ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. यामध्ये त्याने दोन षटके निर्धाव टाकली. भारताची २०० धावा गाठण्याची आशाही जवळपास संपुष्टात आली. एक सन्मानजनक धावसंख्या उभारेल असे वाटत असताना भारतीय फलंदाजी ढेपाळली. फक्त राहुलने ७० चेंडूत ७३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याने इबादत हसनच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट इनामूलकडे गेला आणि त्याने उत्कृष्ट झेल घेतला. भारताची धावसंख्या ४० षटकांनंतर ९ बाद १७९ अशी होती. आता मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन क्रीजवर असताना एक-दोन मोठे फटके मारत २०० पार धावसंख्या होईल असे वाटत होते मात्र त्यांना देखील ते फटके मारण्यात अपयश आले. इबादत हसनने या सामन्यात तीन गडी बाद करत शाकीबला साथ दिली.