India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला आहे. भारताने या डावात दमदार सुरूवात केली होती. मात्र, हवा तसा शेवट करत आलेला आहे. भारतीय संघाने अवघ्या ४१ धावांवर ७ विकेट्स गमावल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली. त्यानंतर शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं आणि ऋषभ पंतने अर्धशतक झळकावलं. गिल आणि पंत जेव्हा पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर नाबाद परतले, त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या ३५९ इतकी होती.

पहिल्याच दिवशी ३५९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ५०० पार जाणार असं वाटलं होतं. मात्र, भारताचा संपूर्ण डाव ४७१ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला ५०० धावांचा पल्ला गाठता आला नाही.

नेमकं काय चुकलं?

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्यावेळी, शुबमन गिल १२७ तर ऋषभ पंत ६५ धावांवर नाबाद होता. गिलने आपल्या खेळीत २० धावा जोडल्या. तो या डावात १४७ धावांवर माघारी परतला. तर ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी २०० हून अधिक धावांची खेळी केली. मात्र, गिलचा विकेट गेल्यानंतर विकेट्सची रांग लागली. तब्बल ७ वर्षांनंतर कमबॅक करत असलेला करूण नायर शून्यावर माघारी परतला. त्यानंतर सेट असलेला ऋषभ पंत १३४ धावांवर माघारी परतला. पंत पाठोपाठ शार्दुल ठाकूर १ धाव करत माघारी परतला. हे ३ प्रमुख फलंदाज पहिला सेशन संपायला अवघे काही मिनिटं असताना बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा बाद झाले आणि प्रसिद्ध कृ्ष्णा बाद होताच भारतीय संघाचा डाव आटोपला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली होती, भारताने ५०० धावांच्या पार जायला हव होतं. असं झालं असतं, तर इंग्लंडच्या फलंदाजांवरील दबाव आणखी वाढला असता. आता इंग्लंडला ४७१ धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. आता इंग्लंडचे फलंदाज आक्रमक फलंदाजी करून भारतीय संघाला मागे सोडण्याचा प्रयत्न करणार, की विकेट्स वाचवून धावांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हवामानात बदल झाल्यामुळे भारतीय गोलंदाजांनाही मदत मिळेल. त्यामुळे भारतीय गोलंदाजही इंग्लंडवर भारी पडू शकतात.