टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन भारताला पात्रतेचं गिफ्ट दिलं आहे. नेदरलँड्सचा विजय झाल्याने दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला असून पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशदरम्यान होणाऱ्या सामन्यातून दुसऱ्या गटातून उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ कोणता हे निश्चित होणार आहे. नेदरलँड्सच्या विजयामुळे उपात्यं फेरीमध्ये भारत कोणाशी दोन हात करणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे नेदरलँड्सचा हा विजय भारताच्या पथ्यावर पडला आहे असं म्हणता येईल इतका भारताचा मार्ग सुखकर झाल्याचं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश; नेदरलँड्सनं जाताजाता दिलं ‘गिफ्ट’

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव झाला. नेदरलँड्सने १५८ धावा करुन दिलेलं लक्ष्य आफ्रिकेला झेपलं नाही. दक्षिण आफ्रिकेने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूंमध्ये २६ धावा हव्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ १२ धावा करता आल्या. या विजयाबरोबरच भारत हा उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. त्यामुळेच आता भारताचा उपांत्य फेरीतील सामना हा न्यूझीलंडऐवजी इंग्लंडविरोधात होण्याची शक्यात अधिक आहे. भारत हा पहिल्या स्थानी कायम राहिल्यास भारत आणि इंग्लंड सामना उपांत्य फेरीत पहायला मिळेल. भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला तरी नेट रन रेटच्या जोरावर सहा गुणांसहीत उपांत्य फेरीत अव्वल स्थानी राहत प्रवेश करणार आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

भारत सुपर १२ फेरीमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला असता तर भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला असता. भारताचा टी-२० वर्ल्डकप आणि एकंदरितच या क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधील रेकॉर्ड फारच वाईट आहे. त्या तुलनेनं भारताला इंग्लंडचा पेपर हा अधिक सोपा आहे. भारत आणि इंग्लंडच्या संघादरम्यान टी-२० चे २२ सामने झाले असून त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने भारताने जिंकले आहेत. मात्र न्यूझीलंडविरुद्ध हाच रेकॉर्ड अगदी उलट आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत एकही सामना अद्याप जिंकता आलेला नाही.

नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी-२० चे २० सामने झाले असून यापैकी ११ सामने भारताने जिंकलेत तर ९ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडच्या संघाला एकदाही पराभूत करता आलेलं नाही. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याऐवजी भारताला इंग्लंडचा पेपर अधिक सोपा असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. इंग्लंड आणि भारतादरम्यान झालेल्या तीन टी-२० विश्वचषक सामन्यांपैकी एकामध्ये इंग्लडने विजय मिळवला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या वर्षीच्या टी-२० विश्वचषक उपांत्यफेरीमध्ये भारत आपलं वर्चस्व कायम राखणार की इंग्लंड भारताला धक्का देणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल.

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि इंग्लंडमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाल्यास तो १० तारखेला अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ९ तारखेला न्यूझीलंड विरुद्द पाकिस्ता आणि बांगलादेशदरम्यानच्या विजेता संघ सामना खेळेल. त्यामुळे भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधीच अंतीम समन्यातील प्रतिस्पर्धी निश्चित झालेला असेल.