Team India, IND vs WI: टीम इंडिया (भारतीय क्रिकेट टीम) बार्बाडोसला पोहोचली आहे. संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका खेळणार आहे, ज्यासाठी सराव सुरू झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सराव करण्यापूर्वी खेळाडूंनी बार्बाडोस बीचवर मस्ती केली. सगळे एकत्र व्हॉलीबॉल खेळत सराव करत आहेत. विराट कोहली, इशान किशन आणि राहुल द्रविड यांच्यासह बहुतेक खेळाडू आणि कोचिंग स्टाफने व्हॉलीबॉल खेळण्याची मजा लुटली. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

१ मिनिट ४६ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये पहिले विमान दिसत आहे, ज्यावर टीम इंडिया बार्बाडोसला पोहोचली. इशान किशन, के.एस. भरत, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणेसह बहुतेक खेळाडू भारतातून बार्बाडोसला आले होते. दुसरीकडे विराट कोहली, रोहित शर्मासह काही खेळाडू सुट्टी संपवून तेथून थेट बार्बाडोसला पोहोचले होते.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल

खेळाडूंनी बीचवर व्हॉलीबॉल खेळला, कोचिंग स्टाफनेही मजा केली

व्हिडीओमध्ये बार्बाडोस बीचवर खेळाडू व्हॉलीबॉल खेळत आहेत. व्हिडीओमध्ये विराट कोहली, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद सिराज असे खेळाडू दिसत आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह संपूर्ण कोचिंग स्टाफ त्याच्यासोबत व्हॉलीबॉल खेळत आहे. या दौऱ्यावर सराव सुरू करण्यापूर्वी खेळाडूंनी व्हॉलीबॉल खेळला. सोमवारी, टीम इंडियाचे खेळाडू बार्बाडोसमध्ये पहिले सराव शिबिर लावतील.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. दोघांमधील कसोटी आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिजला २००२ पासून भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यानंतरची ८ कसोटी मालिका भारताने जिंकली आहे. या अर्थाने भारत बलाढय़ दिसत आहे. सध्या वेस्ट इंडिजचे मनोधैर्यही खूपच खालावले आहे. खरंतर, झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडिजची कामगिरी अत्यंत खराब होती. इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा वेस्ट इंडिज क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही.

विशेष म्हणजे, बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्ध ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या तरुणांना संधी दिली आहे. याशिवाय त्यांनी चेतेश्वर पुजाराला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता त्या जागी पुजाराला संधी मिळते का हे पाहायचे आहे. दोन्ही युवा खेळाडू जबाबदारी पेलण्यास सक्षम आहेत. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा या तरुणांना नक्कीच संधी देणार आहे.

हेही वाचा: T20 Team: मिशन टी२० वर्ल्डकप! BCCI नवे मुख्य निवडकर्ता सहा दिग्गज खेळाडूंच्या भविष्यावर घेणार निर्णय, रोहित-विराटचे काय होणार?

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

कसोटी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एस. भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.