‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान आमच्यापुढे असले तरी आम्ही त्याचे दडपण घेत नाही. कारण आम्ही त्यांच्यावर आशिया स्पर्धेतील अंतिम सामन्यात मात केली आहे,’’ असे भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाचा कर्णधार विजय झोलने सांगितले.
‘‘पाकिस्तानविरुद्धचा सामना हा नेहमीच अन्य सामन्यांपेक्षा वेगळा असतो. मात्र आशिया स्पर्धेत आम्ही त्यांना साखळी लढतीत व नंतर अंतिम सामन्यात हरविले असल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे झोल म्हणाला.
अबू धाबी येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी गटात भारताला पाकिस्तान, स्कॉटलंड व पापुआ न्यू गिनी यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताचा पाकिस्तानबरोबर १५ फेब्रुवारी रोजी सामना होईल.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
युवा विश्वचषक स्पध्रेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे दडपण नाही – विजय झोल
‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान आमच्यापुढे असले तरी आम्ही त्याचे दडपण घेत नाही.
First published on: 08-02-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India u 19 captain vijay zol confident of beating pakistan in world cup opener