लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात पाचवा एकदिवसीय सामना खेळला गेला. यात आफ्रिका संघाने भारतला 5 गड्यांनी धूळ चारली. या विजयासह आफ्रिकाने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 4-1 अशी जिंकली आहे. बोशच्या अर्धशतकी खेळीमुळे तिला सामनावीर तर, लिझेली ली हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या 189 धावांच्या माफक आव्हाना पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. 30 धावांच्या आत भारताने आफ्रिकेच्या लोरा वॉलवॉर्ट(0), लारा गुडऑल(1) आणि कर्णधार सुने लूस(10) यांना बाद करत रंगत निर्माण केली. यानंतर डु प्रेज आणि एने बोश यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 96 धावांची भागिदारी रचली. बोशने 8 चौकारांसह 58 तर, डु प्रेजने 4 चौकारांसह 57 धावा केल्या. ही जोडी तुटल्यानंतर मरिजाने काप आणि क्लर्कने संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 3 तर, हेमलता आणि सी. प्रत्युषा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India women vs south africa women fifth odi match analysis adn
First published on: 17-03-2021 at 13:22 IST