आयपीएल स्पर्धेतील पाच जेतेपदांचा नायक असलेला मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या हंगामातून जवळपास बाहेर पडला आहे. निराशाजनक प्रदर्शनामुळे मुंबईला यंदा आपला प्रवास प्लेऑफच्या आधीच थांबवावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या या परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी कप्तान सलमान बटने भाष्य केले. मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला, ही चांगली गोष्ट असल्याचे मत बटने दिले.

आपल्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणादरम्यान सलमान बट म्हणाला, ”ही चांगली गोष्ट आहे, की मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. कारण जेव्हा ते शेवटून जिंकण्यास सुरुवात करतात, तेव्हा ते बहुतेक वेळा जेतेपद पटकावतात. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स सारख्या नवीन संघांनी जेतेपद पटकावले तर चांगले होईल. मुंबई इंडियन्स हा अतिशय धोकादायक संघ आहे.”

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय
Moin Khan strong warning to BCCI Team India
IND vs PAK : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नाही तर…’, मोईन खानने दिला इशारा
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?

हेही वाचा – अबब..! भारताच्या पहिल्या वर्ल्डकप ट्रॉफीला मिळाली ‘इतकी’ किंमत!

मुंबई इंडियन्स सध्या १३ सामन्यांत सहा विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. कारण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना अपेक्षित निव्वळ धावगती गाठणे कठीण आहे, क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही पण तसे क्वचितच होते. आज मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. बाद फेरीत जाण्यासाठी आणि निव्वळ धावगती वाढवण्यासाठी मुंबईला १७१ पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागेल.

पण नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी घेतली, तर मुंबई त्याच वेळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.