scorecardresearch

IPL 2023: आयपीएल सुरू होण्याआधीच बीसीसीआयची चिंता वाढली, IPL फ्रँचायझींना दिल्या सक्त सूचना

यंदाच्या आयपीएलला ३१ मार्चपासून सुरुवात होणार असून यापूर्वीच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंबाबत कठोर भूमिका घेतली आहे. आयपीएल फ्रँचायझींना सक्त सूचना देत व्यक्त नाराजी केली.

IPL 2023: BCCI strict about Team India’s players gave strict instructions to IPL franchises
सौजन्य- (ट्विटर)

BCCI warns IPL Franchises: यंदाच्या आयपीएलला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात करायची आहे. यापूर्वी बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल फ्रँचायझींना कडक सूचना दिल्या आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत बीसीसीआयने हे निर्देश दिले आहेत.

बीसीसीआयने घेतली कठोर भूमिका

आयपीएल सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना सूचना दिल्या आहेत. त्यांचेही काटेकोर पालन करावे, असे मंडळाने म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या दुखापतीमुळे बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा: Golden Day for Girls: ४ सुवर्णपदक तर १ चमचमती गोल्डन ट्रॉफी, भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे! इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात…

टीम इंडियाच्या खेळाडूंना दिल्या सूचना

बीसीसीआयने व्हर्च्युअल मीटिंगद्वारे संघांना या सूचना दिल्या आहेत. एनसीएचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल आणि संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई या बैठकीत उपस्थित होते. वृत्तानुसार, या बैठकीत असे सांगण्यात आले की, फ्रँचायझींनी खेळाडूंवर जास्त दबाव आणू नये. त्याच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोणतीही फ्रँचायझी कोणत्याही खेळाडूवर दबाव आणणार नाही आणि त्यावर देखरेख करण्यासाठी बीसीसीआय फ्रँचायझींच्या सतत संपर्कात असेल.

भारतीय संघाला ICC स्पर्धा खेळायच्या आहेत

वास्तविक, टीम इंडियाला आयपीएल संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. एवढेच नाही तर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषकही संघाला खेळायचा आहे. सतत दुखापत होत असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने हे मोठे पाऊल उचलले आहे. जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळत नाहीत. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंना आयसीसी स्पर्धांपूर्वी संघात सामील होणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा: IPL 2023: ख्रिस गेलची कोहलीसोबत डान्स स्पर्धा ठेवली तर कोण जिंकणार? जाणून घ्या ‘युनिव्हर्स बॉस’ने काय दिले उत्तर

बीसीसीआय ‘या’ दोन देशांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालू शकते

खरं तर, बांगलादेश आणि श्रीलंका संघातील खेळाडू, जे वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझींचा भाग आहेत, उशीरा आपापल्या संघात सामील होतील. यावर बीसीसीआय नाराज असून या दोन देशांतील खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदीही घालू शकते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की पुढे जाऊन श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते. यामागील कारण म्हणजे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आपले वेळापत्रक राष्ट्रीय संघाच्या खेळांच्या वेळापत्रकानुसार निश्चित करते. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. त्यामुळेच शाकीब अल हसन, लिटन दास आणि मुशफिकर रहीम यांना ९ एप्रिल ते ५ मे आणि त्यानंतर १५ मेपर्यंत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. खेळाडूंच्या तुटपुंज्या उपलब्धतेमुळे बीसीसीआय नाराज आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 19:54 IST

संबंधित बातम्या