Ishant Sharma Reveals About Dhoni Angry on Virat Kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. पण मैदानावरील खेळाडूंवर माहीला राग येतो, असा खुलासा इशांत शर्माने केला आहे. तो चूक केल्यावर ज्या पद्धतीने पाहतो, ते पाहून समजते की तो आपल्यावर रागावला आहे. त्यानंतर इशांत शर्मा पुढे म्हणाला की, माही एकदा विराट कोहली रागावला होता. हा खुलासा वेगवान गोलंदाजाने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये केला आहे. एकदा धोनीने कोहलीला कसे समजवण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेबद्दल इशांत शर्मा म्हणाला, “माही भाईला फारसा राग येत नाही, पण एकदा तो कोहलीवरही रागवला होता. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळत होतो. शिखर धवनचा तो पदार्पणाचा सामना होता. सामन्यातील दुसरा डावात अडचणीत आला होता. कारण शिखर धवन दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकलो नाही.

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

इशांत पुढे म्हणाला, “त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे कसोटी सामना अडचण निर्माण झाली होती. दुसऱ्या डावात कोहलीही बाद झाला होता, पण हा कसोटी सामना आम्ही जिंकला होता. त्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलच्या लिफ्टमध्ये होतो. तो कोहलीला म्हणाला, आपल्याकडे कमी फलंदाज आहेत, हे माहीत असताना तो फटका मारायची काय गरज होती.”

हेही वाचा – ODI World Cup 2023: केन विल्यमसनने दुखापतीनंतरही मानली नाही हार, विश्वचषक स्पर्धेची करतोय तयारी, पाहा VIDEO

भारताचा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “तिथे धोनीने फारसा राग दाखवला नाही, पण त्याने कोहलीला हे सांगून एक मुद्दा सांगितला आणि त्याचे महत्त्व काय आहे, याची जाणीव करून दिली. माही भाई मला पण खूप काही सांगायचे पण एक मोठा भाऊ म्हणून. माही भाईचा, हा मार्ग आम्हाला समजावण्याचा आणि खेळाडूंना पुढे नेण्याचा आहे.”

इशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०५ सामने खेळले असून या कालावधीत त्याला ३११ विकेट्स घेण्यात यश आले आहे. याशिवाय त्याने ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये ११५ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. इशांतच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ विकेट आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशांतचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही.