कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांचे जतन आणि विकास करण्याच्या दृष्टीने आगामी काळात माझे प्रयत्न असतील असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.
एन.श्रीनिवासन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्ष पदावर रुजू होणार आहेत. आयसीसीचा महसूल आणि सत्तेची रचना यावर भारताचे नियंत्रण असणार आहे. या पार्श्वभूमीवर एन.श्रीनिवासन यांनी आगामी काळातील आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. एन.श्रीनिवासन म्हणाले की,”माझ्यासाठी क्रिकेटचे तिन्ही प्रकार महत्वाचे आहेत. त्यामुळे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारांचे जतन आणि विकास करण्याचे माझे प्रयत्न असतील.”