Rohit Sharma Trolled for Choosing Fielding First IND vs AUS Gabba Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये गाबाच्या मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकत कोणता संघ आघाडी मिळवणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. तत्पूर्वी तिसऱ्या कसोटीची नाणेफेक जिंकत रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा मोठा निर्णय घेतला. रोहितच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर सध्या प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत, भारतीय संघ कधीही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करून सामना जिंकू शकला नाही. त्यामुळे रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली, यामागची कारणं काय आहेत जाणून घ्या.

गाबाच्या मैदानावरील प्रथम गोलंदाजी करतानाचा रेकॉर्ड

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

२००० सालानंतर गाबाच्या मैदानावर २४ सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करताना सरासरी ३४९ धावांचा रेकॉर्ड आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना फायदा झाला आहे. ताज्या खेळपट्ट्यांवर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना दोनदा विरोधी संघाला २०० धावांच्या आत रोखण्यात यश आले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: गाबा कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघात २ मोठे बदल; हर्षित राणा-अश्विन…

गाबाच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना सामान्यतः अधिक उसळी आणि वेग मिळतो. यामुळे गेल्या २४ वर्षात वेगवान गोलंदाजांनी ३१ च्या सरासरीने ५६१ विकेट घेतल्या आहेत. तर फिरकीपटूंनी ४२ च्या सरासरीने १४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय या मैदानावर आतापर्यंत झालेल्या एकूण ६६ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना २६ वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने २७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर १३ सामने अनिर्णित राहिले. २०२१ नंतर गाबाच्या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

खेळपट्टी आणि ढगाळ परिस्थिती

ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर हिरवं गवत आहे आणि साधारणपणे वर्षाच्या या कालावधीत या खेळपट्टीवर थोडा अधिक बाऊन्स मिळतो. २०२१ मधील ऐतिहासिक लढतीसाठी यजमानांनी जी खेळपट्टी तयार केली होती त्यापेक्षा यंदाची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. शिवाय, रोहितने सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्यामागील कारण म्हणून ढगाळ परिस्थितीचा स्पष्टपणे उल्लेख केला आणि रोहितचा हा निर्णय तार्किक असल्याने योग्य असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाविरूद्ध अनोखं ‘शतक’, सचिन तेंडुलकरनंतर ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू

भारताच्या फलंदाजी बाजूने केलेली निराशा

खेळण्याच्या परिस्थितीव्यतिरिक्त, भारतीय फलंदाजांना सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. याशिवाय वेगवान गोलंदाजीविरूद्ध आणि मुव्ह होणाऱ्या चेंडूविरुद्ध भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. भारतीय फलंदाज कांगारू संघाच्या वेगवान गोलंदाजी माऱ्यासमोर खेळताना फारसे आत्मविश्वासाने उतरले नव्हते आणि यजमानांना कठीण परिस्थितीत फलंदाजी करू देऊन भारताने निश्चितपणे आणखी एक फलंदाजी कोसळणे टाळल. त्यामुळे भारतीय फलंदाजीचा विचार करताही रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो.

हेही वाचा – Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी

कसोटी क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करणे हे सामान्यतः पारंपारिक मानले जात असले तरी, गाबाच्या मैदानावर सुरूवातीला वेगवान गोलंदाजांनी चांगली मदत मिळते आणि नंतर फलंदाजीसाठी ट्रॅक अधिक चांगला होतो. भारतीय गोलंदाजांची लाईन आणि लेंग्थ अचून नव्हती. त्यामुळे ख्वाजा आणि मॅकस्विनी यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने अनेक सामने खेळले आहेत, त्यामुळे त्यांना मागे टाकणं टीम इंडियासाठी सोप नसणार आहे. अशा प्रकारे, रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय संघाच्या हिताचा आहे.

Story img Loader