South Africa vs India, 1st Test Day 4: भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळली जात आहे. चौथ्याच्या दिवशीचा खेळ संपला आहे आणि दक्षिण अफ्रिका विजयासाठी ३०५ धावसंख्येचा पाठलाग करत आहे. त्यांना आणखी २११ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर आणखी ६ विकेटची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अफ्रिका संघ ४ बाद ९४ वर खेळत होता.

दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार डीन एल्गरने ५२ धावा केल्या असून तो नाबाद खेळत आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

याआधी दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंत भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ३४ धावा केल्या. रबाडा आणि डेब्यू मेन मार्कोने प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. भारताची दुसरी इनिंग केवळ १७४ धावांमध्ये आटोपली. अशाप्रकारे भारताने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध ३०४ धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी ३०५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

“मैदानावर एकदाच ३०० पेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग”

विशेष म्हणजे या मैदानावर शतकभराच्या काळात केवळ एकदाच चौथ्या इनिंगला ३०० पेक्षा अधिकच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. त्यामुळे अफ्रिकेलाही हा पाठलाग कठीण जाईल, असं बोललं जातंय. त्यामुळेच भारताच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अंतिम निकाल दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीवरच अवलंबून असणार आहे.

हेही वाचा : Ind vs SA: …आणि मैदानावर विराट कोहलीने केला भन्नाट डान्स; व्हिडीओ Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मैदानाच्या इतिहासात एकदाच २००१-०२ मध्ये दक्षिण अफ्रिकेच्या देशांतर्गत सामन्यावेळी ३०० पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं.