काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या २१व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने निर्विवाद वर्चस्वाची मालिका कायम राखताना पदकांच्या त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सोमवारी भारताने २७ सुवर्ण, १२ रौप्य आणि ३ कांस्यपदकांसह एकूण ४२ पदकांची कमाी केली. त्यामुळे भारताच्या खात्यावर १५९ सुवर्ण, ९१ रौप्य, ४४ कांस्य पदकांसह एकूण २९४ पदके जमा आहेत. मंगळवारी अंतिम दिवशीसुद्धा भारत अग्रस्थानी राहणार, हे पक्के झाले असून भारताने सलग १३व्यांदा अग्रस्थान पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.

कबड्डी : भारताला दुहेरी सुवर्णयश

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत

काठमांडू : काठमांडू येथील एपीएफ सभागृहात झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणेच दुहेरी सुवर्णयश मिळवले. पुरुष गटात भारताने श्रीलंकेला, तर महिलांमध्ये नेपाळला नमवले.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत २८-११ अशी मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली होती. पवन कुमार शेरावत, नवीन कुमार यांनी आक्रमक चढाया करत भारताला आघाडी मिळून दिली, तर पकडीत नितेश कुमार, परवेश, विशाल भारद्वाज यांनी चांगला खेळ केला. मग भारताने ५१-१८ असा श्रीलंकेचा धुव्वा उडवला.

महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात १४-१० अशी आघाडी भारताकडे होती. परंतु उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमक खेळ करत ५०-१३ असा एकतर्फी विजय मिळवला. भारताकडून चढाईत सोनाली शिंगटे, पुष्पा, साक्षी कुमारी यांनी दिमाखदार खेळ केला, तर दीपिका जोसेफ, प्रियांका, रितू नेगी यांनी उत्कृष्ट पकडी केल्या.