टी-२० वर्ल्डकपच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये असणारा भारतीय संघ नाराज असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळत आहे. सराव करण्यासाठी दिलेलं मैदान आणि जेवणावरुन भारतीय संघ नाराज आहे. नाराज भारतीय संघाने सराव करण्यासही नकार दिल्याचं समजत आहे. गुरुवारी भारतीय संघाचा नेदरलँडशी सामना होणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनीमध्ये सरावानंतर दिल्या जाणाऱ्या जेवणावर भारतीय संघ नाराज आहे. गरम जेवण दिलं जात नसल्याने खेळाडूंनी नाराजी जाहीर केली आहे. जेवणामध्ये फक्त सँडविचचा समावेश आहे.

“खड्ड्यात गेली खिलाडूवृत्ती,” हार्दिक पांड्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला “जर नियम आहे तर…”

“भारतीय संघाला पुरवण्यात आलेलं जेवण चांगलं नाही. त्यांना फक्त सँडविच देण्यात आलं. त्यांनी आयसीसीकडे यासंबंधी तक्रार केली असून जेवण थंड आणि चांगलं नव्हतं असं कळवलं आहे,” अशी माहिती बीसीसीआय सूत्राने दिली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान, आयसीसीकडे जेवण पुरवण्याची जबाबदारी असते.

सराव करण्यासही नकार

दरम्यान भारतीय संघाने सरावातही सहभाग घेतलेला नाही. कारण, भारतीय संघाला सरावासाठी देण्यात आलेलं ब्लॅकटाउनमधील मैदान हॉटेलपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितल्यानुसार, “भारतीय संघ सरावातही सहभागी झालेला नाही. सरावासाठी त्यांना ब्लॅकटाउनमधील मैदान देण्यात आलं होतं. पण राहत असलेल्या हॉटेलपासून हे मैदान ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने भारतीय संघाने सराव करण्यास नकार दिला आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ आता नेदरलँडशी भिडणार आहे. २७ ऑक्टोबरल सिडनी क्रिकेट मैदानात दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. नेदरलँडचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.