शनिवारी बहरीनमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठक पार पडली. या पहिल्या औपचारिक बैठकीनंतर एक निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी स्थळाचा निर्णय घेईल, असे ठरले आहे.

आशिया कपच्या यजमानपदाचे अधिकार सुरुवातीला पाकिस्तानला देण्यात आले. त्याचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये होणार होते, परंतु एसीसीसीचे प्रमुख शाह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले की, भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईची तीन ठिकाणे – दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे या स्पर्धेचे यजमानपदासाठी प्रबळ दावेदार आहेत, परंतु निर्णय तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

एसीसीद्वारे खंडीय संस्थेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पीसीबी चेअरमन सेठी यांच्या आदेशानुसार बोलावण्यात आली होती. या बैठकीला एसीसी सदस्य राष्ट्रांचे सर्व प्रमुख उपस्थित होते, ज्यामध्ये पाकिस्तानचे यजमान म्हणून नाव दिले नाही.

हेही वाचा – Court on Ayesha Mukherjee: शिखर धवनची पत्नी आयेशाला कोर्टाने सुनावलं; धवनच्याविरुद्धात ‘या’ गोष्टी करण्यास केली मनाई

याबाबत माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “एसीसी सदस्यांची आज बैठक झाली आणि खूप सकारात्मक चर्चा झाली. मात्र स्थळ स्थलांतराचा निर्णय मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पण खात्री बाळगा की भारत पाकिस्तानात जाणार नाही, स्पर्धाच दुसरीकडे हलवली जाईल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या खेळाडूंशिवाय प्रायोजक स्पर्धेतून माघार घेतील.”

हेही वाचा – IND vs AUS: नाद करा पण धोनीचा कुठं…! बॉर्डर गावसकर मालिकेतही भल्या-भल्यांना टाकलंय मागं, पाहा विक्रम

एसीसीच्या एका आतील व्यक्तीने सांगितले की सेठी अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष बनले आहेत. जर त्यांनी पहिल्याच बैठकीत माघार घेतली, तर त्याचा त्यांच्या देशात वाईट परिणाम होईल. पाकिस्तान सध्या आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करत आहे. आशिया चषक सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणे पीसीबीसाठी तोट्याचा करार ठरेल, जरी एसीसीने त्यांना अनुदाने दिले तरीही.