भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पुढील आठवड्यापासून ४ सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळला जाणार आहे. या ट्रॉफीचा इतिहास पाहिला तर याची सुरुवात १९९६-९७ पासून सुरू झाली. बॉर्डर गावसकर मालिकेतील सर्वात मोठा विक्रम हा एमएस धोनीच्या नावावर आहे.

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, एमएस धोनीने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या एकूण १३ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे. यापैकी त्यांनी ८ जिंकले आहेत. दोन्ही देशांच्या कर्णधाराचा या ट्रॉफीतील हा सर्वाधिक विजय आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ आणि मायकेल क्लार्क यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी प्रत्येकी पाच विजय मिळवले आहेत.

Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights Match in Marathi
LSG vs CSK Highlights, IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय, राहुल-डी कॉकने झळकावले अर्धशतक
IPL 2024 DC vs LSG Match Updates in Marathi
LSG vs DC IPL 2024 : आयुष बडोनीने एमएस धोनीच्या खास विक्रमाशी साधली बरोबरी, ‘या’ विशेष यादीत झाला सामील
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचा क्रमांक लागतो. या यादीत टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२०-२१ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला होती.

हेही वाचा – SA20: जॉन्टी ऱ्होड्सच्या ‘त्या’ कृत्तीने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

बॉर्डर-गावसकर मालिकेवर भारताचे वर्चस्व –

१९९६-९७ पासून सुनील गावसकर आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावाने ही मालिका सुरू झाली. भारताने या ट्रॉफीमध्ये एकूण ९ वेळा ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने ६ वेळा आयोजन केले आहे. भारतीय संघ १५ पैकी ९ वेळा मालिका विजेता ठरला आहे, तर कांगारू संघ फक्त ४ वेळा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करू शकला आहे. २००३-०४ मध्ये ही मालिका १-१अशी बरोबरीत सुटली होती. यादरम्यान एकूण ५२ सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने २२ आणि ऑस्ट्रेलियाने १९ जिंकले आहेत. तर ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.

गेल्या ८ वर्षांपासून भारत अजिंक्य –

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने २०१४-१५ मध्ये ही ट्रॉफी शेवटची गमावली होती. तेव्हापासून हा संघ अजिंक्य आहे आणि त्याने तीनदा ट्रॉफी जिंकली आहे. सध्या, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली 2020-21 मध्ये ट्रॉफी जिंकणारा भारत गतविजेता आहे.

हेही वाचा – ४,४,२,६,४,६: किरॉन पोलार्डच्या वादळासमोर आंद्रे रसेलने टेकले गुडघे; एकाच षटकात २६ धावा कुटल्याने VIDEO होतोय व्हायरल

विशेष म्हणजे टीम इंडियाने यापूर्वीच्या दोन्ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियन भूमीवर जिंकल्या आहेत. दुसरीकडे २००४-०५ मध्ये भारताला घरच्या मैदानावर ९ पैकी फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला होता. यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही १६वी वेळ असेल. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स हे दोघेही या ट्रॉफीमध्ये प्रथमच आपापल्या संघाचे नेतृत्व करणार आहेत.