टी२०विश्वचषक २०२२ मध्ये संघाच्या खराब खेळामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेटचा महिला संघ आयर्लंडविरुद्ध त्यांच्याच घरात मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफने एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

शाहिद आफ्रिदीनंतर आता महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफने पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) महिला खेळाडूंच्या सामना फी मध्ये गेल्या आठ वर्षांत वाढ न केल्याने तिने नाराजी व्यक्त केली आहे.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

बिस्माह मारूफचा मोठा खुलासा

गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. अशा परिस्थितीत आता अनेक क्रिकेट मंडळे महिला क्रिकेटपटूंनाही पुरुष क्रिकेटपटूंएवढेच मानधन देण्याचा विचार करत आहेत. भारत आणि न्यूझीलंडसारख्या क्रिकेट मंडळानी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पण या सगळ्यामध्ये बिस्माह मारूफने पीसीबीवर आरोप केला आहे की, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने गेल्या आठ वर्षांपासून त्याचा पगार वाढवला नाही.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टीम इंडियासाठी वेकअप कॉल! सुरेश रैनाने भारतीय संघाला सुनावले खडेबोल

पीसीबीची सर्वासमोर झाली फजिती

लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना बिस्माह मारूफ म्हणाली, “मला वाटते की महिला क्रिकेटपटूही खूप मेहनत करतात. पण भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांशी बरोबरी साधण्यासाठी पाकिस्तानमधील महिला क्रिकेटला खूप प्रगती करण्याची गरज आहे यात शंका नाही. मंडळाने खेळाडूंना निश्चितच काही बक्षीस दिले असून उत्तम प्रशिक्षणासाठी सुविधाही दिल्याचे त्यांनी सांगितले. पण पगार न वाढवणे त्याला आणि संघाला नक्कीच ठोठावत आहे.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये दाखल! आयर्लंडचा ३५ धावांनी केला पराभव

बीसीसीआयने ही मोठी घोषणा केली आहे

गेल्या महिन्यात एक मोठी घोषणा करताना बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाचे सामना मानधन पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीने केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, “यापुढे महिलांनाही पुरुषांप्रमाणेच सामन्याचे मानधन मिळणार. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी १५ लाख रुपये उपलब्ध आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी ६ लाख रुपये दिले जातात.