विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या टी-२० संघात आता विराट कोहलीची भूमिका काय असावी हे त्याने सांगितले आहे. सेहवागच्या मते, सचिन तेंडुलकर भारतीय संघासाठी जी भूमिका बजावत होता, तीच भूमिका आता विराट कोहलीनेही साकारायला हवी.

वीरेंद्र सेहवागच्या म्हणण्यानुसार, अनेक दिग्गज फलंदाज सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि एमएस धोनी संघात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत आणि गरज पडल्यास कर्णधाराला टिप्सही देत ​​असत. विराट कोहलीनेही भारतीय संघासाठी हीच भूमिका बजावली पाहिजे, असे सेहवागने सांगितले.

क्रिकबझवरील संभाषणात वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “सचिन तेंडुलकर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळला. एखादा नवा कर्णधार आला तरी तो त्यांचे विचार त्यांच्याशी शेअर करायचा. त्यानंतर कर्णधार ती गोष्ट अमलात आणायचा. विराट कोहली. ते आणि रोहित शर्मा हे नेते आहेत आणि कर्णधार आणि तरुणांना पाठिंबा देणे हे त्यांचे काम असेल.”

हेही वाचा – “विराट लवकरच टी-२० क्रिकेटमधून निवृत्त…”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. केएल राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. संघातील काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान यांचा समावेश करण्यात आला आहे. यजुर्वेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड आणि मोहम्मद सिराज संघात परतले आहेत. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड संघाचा पहिला सामना १७ नोव्हेंबरला होणार आहे.