नवी दिल्ली : उन्हाळय़ाने आता रौद्र रूप धारण केले आहे. तुम्ही जेवढा जास्त काळ उन्हात घालवाल, तेवढा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. तज्ज्ञांच्या मतानुसार उन्हाळय़ात घाम, घामोळय़ा, पेटके येणे, चक्कर येणे, नाडी मंदावणे, डोकेदुखी आदी अल्पकाळ टिकणारे दुष्परिणाम तर होतातच. परंतु आरोग्याच्या दीर्घकालीन समस्याही होऊ शकतात. वाढलेल्या उष्म्याने उष्माघातासह मूत्रिपडविकार, गोवर, कावीळ, अपुऱ्या वाढीच्या अर्भकास जन्म देणे, गर्भपात आदी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांनी सांगितले, की सोडियम, पोटॅशियमसारख्या क्षारांचे शरीरात योग्य प्रमाण राखणे गरजेचे असते. त्यामुळे आपली मज्जासंस्था आणि मेंदूचे कार्य योग्यरीत्या चालते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराची क्षारांची गरज भागते. तसेच अधिक क्षार मूत्रिपडाद्वारे बाहेर टाकले जातात. कमी पाणी प्यायल्यास क्षार मूत्रिपडात जमा होऊन मूतखडय़ाचा धोका असतो. गर्भवतींनी या काळात विशेष काळजी घ्यावी. फलाहारावर भर द्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या काळात थेट उन्हाशी संपर्क शक्यतो टाळावा. बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावावे. शरीराच्या तापमानाचे संतुलन राखावे. चक्करल्यासारखे किंवा तापल्यासारखे वाटल्यास त्वरित सावलीत, थंड भागात जावे. उन्हाळय़ात मिताहार ठेवावा. थोडय़ा थोडय़ा प्रमाणात ठरावीक वेळाने खावे. कबरेदकांचा समावेश असलेले व तेलकट पदार्थाचे भरपेट जेवण टाळावे.  या पदार्थानी शरीरातील उष्णता वाढीस लागते. या काळात या हंगामातील ताजी फळे व भाजीपाला खावा. किलगडे, संत्री, नारळ पाणी, तीळ, काकडी, टोमॅटो, पुदिना, बडीशेपेचे सेवन या काळात करावे. फळांत जीवनसत्त्वे, क्षार, तंतुमय पदार्थ आणि चांगली शर्करा असते. त्यामुळे ऊर्जा मिळते. आपण ताजेतवाने राहतो. शरीरातील पचनशक्तीही चांगली राहते. बद्धकोष्ठता दूर राहून पोटाचे आरोग्यही उत्तम राहते. या काळात मद्यसेवन, कृत्रिम थंड पेय, काबरेनेटेड पेय, कॉफी सेवनाने शरीरातून निर्जलीकरण होते.