“सलग ७२ तासांच्या उपवासाला तीन दिवस पाणी पिऊन केलेला उपवास म्हणून ओळखले जाते. हा उपवास केल्यानंतर तुमच्या शरीरावर विविध परिणाम होतात. सुरुवातीला तुमच्या शरीरात साठवलेले ग्लायकोजेन (Glycogen) ऊर्जा म्हणून वापरले जाते; ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. जसजसा उपवास चालू राहतो, तसतसे शरीराचे केटोसिसमध्ये (Ketosis) रूपांतर होते; जे उर्जेसाठी फॅट्सचा वापर करते. ही चयापचयाची स्थिती वजन कमी करण्यास मदत करू शकते,” असे गुरुग्रामच्या नारायणा हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसीन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज वर्मा यांनी सांगितले आहे.

उपवासादरम्यान इन्सुलिनच्या पातळीत संभाव्य घट झाल्याने इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) सुधारते. “ऑटोफॅजी (Autophagy) ही एक प्रक्रिया आहे; जिथे शरीर खराब झालेल्या पेशी काढून टाकते. ही प्रक्रियादेखील वाढू शकते; ज्यामुळे पेशींसंबंधित आरोग्यास (Cellular Health) फायदा होतो,” असे डॉ. वर्मा यांनी स्पष्ट केले.

doctor successfully performed complicated surgery and gave a new life to elderly person
ज्येष्ठ नागरिकाच्या जगण्याची केवळ दोन टक्के शक्यता असूनही असे वाचले प्राण…
Blood Sugar Control Tips
मध, गूळाच्या सेवनाने ब्लड शुगर होईल कमी? डायबिटीज रुग्णांना तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
are you addicted your favourite lip balm then read what doctor said
तुम्हालाही ओठांना सतत लिप बाम लावण्याचे व्यसन तर नाही ना? काय होतात परिणाम? वाचा डॉक्टरांचे मत….
do wake up 45 minutes before sunrise really helps detoxing your body naturally
सूर्योदयाच्या ४५ मिनिटांपूर्वी उठल्याने खरंच शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते का?
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

सलग ७२ तास उपवास केल्याने एकत्रितपणे सात हजार कॅलरीजची घट होते; जी दोन पौंड फॅट्सच्या समान असते. “जर ७२ तासांचा उपवास जास्त काळ केला, तर त्याचा वजनावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि अडॅप्टिव्ह थर्मोजेनेसिसमुळे (Adaptive Thermogenesis) वजन वाढू शकते. अशा उपवासांमध्ये पुरेसे पाणी, इलेक्ट्रोलाइट, जीवनसत्त्वे, खनिजे भरून काढण्याची खात्री केली पाहिजे,” असे डॉ. दिलीप गुडे, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांनी नमूद केले.

पण, जास्त तास उपवास करण्याचे तोटे असू शकतात. पोषक घटकांची कमतरता उदभवू शकते; ज्यामुळे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.

हेही वाचा – ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते का? संशोधनाबाबत काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या 

“शरीर पर्यायी ऊर्जास्रोत शोधत असल्याने स्नायूंचे वस्तुमान (Muscle mass) कमी होऊ शकते. निर्जलीकरण (Dehydration) ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे द्रवपदार्थांचे योग्य तेवढे सेवन केले जाणे आवश्यक आहे,” डॉ. वर्मा यांनी सांगितले.

७२ तासांचा उपवास ‘धोकादायक’ आहे, असे डॉ. गुडे यांनी सांगितले. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “७२ तासांचा उपवास सहसा शरीराच्या चयापचय क्रियेला केटोन्सकडे (ketones) ढकलतो आणि हे लघवीतील केटोन्स शरीरामध्ये (Starvation Ketosis) दिसून येते. (केटोन्स हे एक प्रकारचे रसायन आहे; जे यकृत जेव्हा फॅट्स वापरते तेव्हा तयार करते. या केटोन्सचा विशेषत: उपवास करताना, दीर्घकाळ व्यायाम करताना किंवा शरीरात जास्त कर्बोदके नसताना तुमचे शरीर उर्जेसाठी वापर करते.)

“असे दीर्घकाळ उपवास कोणत्याही देखरेखीशिवाय करणे बहुतांशी धोकादायक असते. हा उपवास करताना जर निर्जलीकरणाची समस्या निर्माण झाली, तर मूत्रपिंडाला बरी न होणारी दुखापत होऊ शकते. हायपोटेन्शन (Hypotension), अॅरिथिमिया (Arrhythmias) व हायपरयुरिसेमिया (Hyperuricemia) यांसारखे आजार, सोडियम, कॅल्शियम व मॅग्नेशियमची कमतरता, लीन मसल्स कमी होणे आणि आम्लयुक्त लघवी (Acidic urine) यांसारखे विविध आजार होऊ शकतात,” असे डॉ. गुडे यांनी सांगितले.

हेही वाचा – आलिंगन किंवा मिठी मारणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

”उपवासाचे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि दीर्घकाळ उपवास करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास आहे त्यांनी, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांनी असे उपवास टाळावेत,” असेही डॉ. गुडे म्हणाले.

डॉ. वर्मा यांच्या मते, “अधूनमधून उपवास केल्याने संभाव्य आरोग्य फायदे दिसून आले आहेत. परंतु, अन्नाशिवाय जास्त कालावधीसाठी उपवास करताना काळजी घेणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – ‘पेपा पिग’, ‘कोको मेलन’ आणि ‘कार्टून मॅरथॉन’ पाहण्यामुळे तुमची मुलं ‘zombie’ झाली आहेत का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

याबाबत सहमती दर्शवीत डॉ. गुडे यांनी सांगितले की, नियंत्रित पद्धतीने उपवास करण्याचे कर्करोग, हृदय बंद पडणे, Parkinson’s /अल्झायमर व इतर न्यूरोडीजनरेटिव्ह (Neurodegenerative) विकार टाळण्याच्या दृष्टीने फायदे दिसून आले आहेत. “चांगल्या जीवाणूंची वाढ होणे आणि वाईट जीवाणू कमी होणे यांसारखे अनुकूल रोगप्रतिकारक प्रतिसादही दिसून येतात. ठरावीक कालावधीसाठी उपवास केल्याने यकृत एन्झाइम (Liver enzymes- एन्झाइम हे सर्व सजीवांतील जैविक क्रिया चालू ठेवणारी वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे)देखील सुधारू शकतात. त्यामुळे दीर्घायुष्य मिळू शकते. इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin sensitivity) सुधारते. तसेच नियंत्रित आणि देखरेखीखाली उपवास केल्यास प्री-डायबेटिक अवस्थेतून बाहेर पडण्याचा फायदा मिळू शकतो,” असे डॉ. गुडे म्हणाले.