फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सतत वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. यात मुंबई काही दिवसांत ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. यामुळे भारतीय हवामान विभागाने मुंबईत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणाही हा इशारा जारी करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना दुपारी प्रखर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यात केरळमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये उन्हाची हिच स्थिती आहे. केरळ राज्य व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दक्षिणेकडील राज्यातील काही भागात तापमान ५४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. अशापरिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यामुळे उष्माघाताची प्रकरणं वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी उष्णतेसंबंधीत आजारांपासून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat wave warnings across india maharashtra people what to do what not to do in summer sjr
First published on: 13-03-2023 at 15:10 IST