Auspious Work In Kharmas 2021 : १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा सर्व शुभ कार्ये थांबतात. कारण खरमास सुरू होत आहे. ही स्थिती सुमारे एक महिना असते. यानंतर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा शुभ कार्य सुरू होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात धनु खरमासला ‘काळा महिना’ असं म्हटलं आहे. त्यामुळे धनु खरमासमध्ये कोणतेही नवीन काम सुरू होत नाही. याशिवाय लग्नासह अनेक शुभ कार्येही निषिद्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. खरमासात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी धनु खरमासात काही कार्य केले जाऊ शकते. खरमासात कोणती कामे शुभ कार्य करता येतील ते जाणून घ्या.
आणखी वाचा : Shani Transit 2022 : ३० वर्षांनंतर शनीचा होणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांचं नशीब उजळणार
प्रेमविवाह किंवा स्वयंवराचा विषय असेल तर विवाह करता येतो. याशिवाय जर कुंडलीत गुरु धनु राशीत असेल तर अशा स्थितीत खरमासात शुभ कार्य होऊ शकतात. खरमाच्या काळातही ते दररोज करत असलेली सर्व कामे चालू ठेवण्यास कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. पूजेशी संबंधित शुभ कार्यही करता येतात. यासोबतच सीमान्त, जातकर्म आणि अन्नप्राशन इत्यादी कामे खरमासाच्या सुरूवातीलाच ठरलेली असल्यास ती खरमास काळात पूर्ण करता येतात. यासोबतच गया येथील श्राद्ध, पितरांचे तर्पण हे धनु खरमासाच्या वेळीही करता येते, हे निषिद्ध नाही.
आणखी वाचा : LPG Cylinder : तुमच्या गॅस सिलेंडरवरही Expiry Date असते, कशी पाहायची, जाणून घ्या सविस्तर…
खरमासमध्ये लग्न का केलं जात नाही?
जीवनात सुख-समृद्धी प्राप्त करणे हा विवाहाचा उद्देश असतो. ज्योतिष शास्त्रात धनु राशीला समृद्धी आणि भाग्याचं लक्षण मानलं जातं. खरमास सुरू होताच सूर्य देव धनु राशीत जातो. जे सुख-समृद्धीसाठी चांगलं मानलं जात नाही. असं मानलं जातं की जर तुम्ही या वेळी लग्न केलं तर तुम्हाला भावनिक सुख किंवा शारीरिक सुख मिळणार नाही. याशिवाय नशीबही कमजोर होऊ लागते. मुलींच्या विवाहासाठी गुरु हा कारक मानला जातो. बृहस्पति कमकुवत असल्यामुळे लग्नाला उशीर होतो. यासोबतच रोजगार आणि व्यवसायातही अडचणी येतात. यामुळे खरमासाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.