Rabindranath Tagore Punyatithi 2023 : भारताचं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ याची रचना ज्यांनी केली असे महान कवी म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी आहे. रवींद्रनाथ टागोर यांची ८२ वी जयंती. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ साली कोलकात्यात एका संपन्न कुटुंबात झाला आणि त्यांचा मृत्यू ७ मे १९४१ मध्ये झाला. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी आणि संगीतकार म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचा नावलौकिक होता. तसेच नोबेल पुरस्कार मिळवणारे आशिया खंडातील ते पहिले नागरिक होते. त्यांनी लिहिलेल्या ‘गीतांजली’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.थोर साहित्यिक, महान कवी, तत्वज्ञ रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृतिदिन.

मानवी मुक्तीचे भाष्यकार – रवींद्रनाथ टागोर

साहित्य तसेच ज्ञानाच्या इतर क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे सच्चे भारतीय व त्याहीपेक्षा सबंध मानवी कल्याणाचा विचार प्रत्यक्ष जगणारे प्रेमळ, हळवे, तसेच स्पष्ट विचारांचे व्यक्ती होते. रवींद्रनाथ टागोर यांनी जवळपास १०० वर्षापूर्वी सांगितलेले विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. चला तर जाणून घेऊया हे विचार…

​रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • आयुष्यातून सूर्य प्रकाश निघून गेला म्हणून जर तुम्ही रडत बसाल, तर तुमच्या अश्रुंमुळं तुम्ही रात्रीचे मोहक चांदणेही पाहू शकणार नाही.
  • माणुसकी असेल तर तुम्ही कोणतंही यश सहज संपादन करू शकता.
  • फुलाच्या पाकळ्या खुडून तुम्ही त्या फुलाची सुंदरता मिळवू शकत नाही.
  • आनंदी राहणं खूप सोपं असत. मात्र, साधेपणा अंगिकारणं कठीण असतं.
  • समुद्रकिनारी उभं राहून पाण्याकडे नुसतं पाहिल्यानं समुद्र पार करता येत नाही.
  • प्रेम कधीही अधिकार गाजवत नाही तर ते स्वातंत्र्य देतं.
  • तथ्य अनेक असले तरी सत्य एकच आहे.
  • आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
  • आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे.

हेही वाचा – Mental Health Special: स्किझोफ्रेनियाविषयी समज गैरसमज

  • कलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.
  • प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.