Health Tips- Monsoon: आला पावसाळा तब्येत सांभाळा हे आपण कायम ऐकत आलो आहोत. पावसाळ्यात आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अशावेळी या गोष्टी लक्षात ठेवा, अशावेळी आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढतात. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या दिवसांत घरातही जेवण करताना काही भाज्या व पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा तुमच्या आरोग्याचे गणित बिघडू शकते. पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवनही विचारपूर्वक केले पाहिजे.
हिरव्या भाज्या-
पावसाळ्या सुरू झाल्यानंतर काही हिरव्या पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे. पालक, मेथी, शेपू अशा भाज्या खाणं टाळावेत. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिरव्या अळ्या असण्याची शक्यता असते. त्यामुळं बॅक्टिरिया पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच या दिवसात पालक, मेथी, शेपू अशा पालेभाज्या न खाणे चांगले. त्याऐवजी पडवळ, दुधी, दोडका अशा भाज्या खाव्या.
मशरुम-
पावसाळ्यात मशरुम खाणं देखील टाळावे. कारण पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यास उलटी आणि पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांचं फेव्हरेट असलेलं आणि आरोग्यासाठी देखील पोषक असलेलं मशरुम पावसाळ्यात खाणं प्रकर्षाने टाळावं. पावसाळ्यामध्ये मशरुम खाल्ल्याने इंफेक्शनचा धोका वाढतो. यामुळे पोटदुखी आणि उलटीचा त्रास होवू शकतो.
हेही वाचा – टोमॅटोशिवाय ‘या’ गोष्टींनी पदार्थात आणा आंबटपणा अन् स्वादिष्ट चव; आहारतज्ज्ञांनी सुचवले पर्याय
वांगी-
वांग्याचा जांभळा रंग बल्ब अल्कलॉइड्स नावाच्या रसायनांपासून तयार होतो. पावसाळ्यामध्ये अशी पिकं कीड आणि इतर कीटकांपासून बचाव करण्यासाठी हे विषारी संयुग तयार करतात. यासाठीच पावसाळ्यात जेव्हा किटकांचा प्रादूर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. तेव्हा वांग्यांचं सेवन कमी करावं.