यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात रिक्षेचा अपघात झाला असून या अपघातात १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राळेगाव तालुक्यातील आष्टा येथे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाला. चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. रिक्षा उलटल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले. तर मोहित पिंपळकर या विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहे. रिक्षा, व्हॅन किंवा बस यामध्ये किती विद्यार्थ्यांना नेता येईल, याबाबत नियमावली असून याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळ आरटीओ आता तरी यासंदर्भात कठोर भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.