मतदान करुन येत असताना तराफा उलटला. या घटनेतून ९५ जण थोडक्यात बचावले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या बोराळा गावात ही घटना घडली आहे. मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र ९५ जण मतदान करुन परतत असताना तानसाच्या पात्रातून तराफ्यातून ९५ जण येत होते. त्याचवेळी हा तराफा उलटला मात्र ९५ जण बचावले आहे. ते बचावले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. रस्ता नसल्याने नदीपात्रातूनच या सगळ्यांना जावं लागलं. तानसा गावात जाऊन मतदान करुन हे सगळे जण परत बोराळा या ठिकाणी परतत होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. हा तराफा बुडाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि मच्छिमारांनी बुडत असलेल्या नागरिकांना ओढून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तानसा मतदान केंद्रावरुन मतदान करुन परतत असताना ही घटना घडली.