भाजपाचे नेते आणि आमदार अॅड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. यासंदर्भातली तक्रार आशिष शेलार यांनी कालच केली आहे. दरम्यान याप्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार सातत्याने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते. त्यामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. टीव्ही नाइनने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.

अॅड. आशिष शेलार यांनी कालच वांद्रे पोलीस ठाण्यात यासंदर्भातली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत मुंब्रा या ठिकाणाहून दोघांना अटक केली.