औरंगाबाद शहरातील राजीव गांधी नगर भागात राहणाऱ्या वैष्णवी जाधव या १२ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डेंग्यू तापामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. महापालिका प्रशासनच या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे असा आरोप आता काँग्रेसकडून केला जातो आहे. तसेच याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका १२ वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला, त्याचमुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबादच्या राजीव गांधी नगर भागात राहणाऱ्या वैष्णवी जाधव या सहावीत शिकणाऱ्या मुलीला ताप आला, त्यानंतर तिला एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. डेंग्यू तापाची लागण या मुलीला झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 12 year old girl dies in aurangabad due to dengue
First published on: 01-09-2017 at 18:46 IST