रत्नागिरी: लोणावळ्यात फिरायला गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मधील एका तरुणाचा गाडी वळवण्यावरून झालेल्या वादातून स्थानिक तरुणांनी खून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवार २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर नऊ जणांना अटक करण्यात आली असून या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुहागरमधून कमलेश धोपावकर हे लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शनासाठी गेले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालून हाणामारीला सुरुवात केली.
याच झालेल्या मारामारीतून कमलेश धोपावकर यांचा खून करण्यात आला. याठिकाणी पोलीस दाखल होवून दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील अन्य नऊ जण फरार झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अधिक तपास करीत आहेत.