अतिशय कठोर नियम आणि निर्बंधांचे पालन करीत ९ मानाच्या पालख्या पंढरीत एकादशी सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या. एकादशी आणि द्वादशीला म्हणजेच गुरुवारी सकाळी सर्व संतांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व पालख्या आपाआपल्या गावी परतल्या. या वर्षी आमच्यासह सर्व संतांच्या पालख्यांना पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभल्याचे मुक्ताई संस्थांचे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले. ‘जातो माघारी पंढरिनाथा, तुझे दर्शन झाले आता’ अशी आर्त विनवणी करीत संतांच्या पालख्या गावी परतल्या.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर अनेक निर्बध होते. प्रमुख ९ पालख्या आणि या पालख्यांबरोबर २० लोकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होण्याची परवानगी प्रशानसनाने दिली होती. तसेच या सर्वाना करोना चाचणी, तोंडावर मास्क, योग्य अंतर आदी आरोग्य विषयक सूचनेचे पालन सक्तीचे होते. विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि परंपरा अखंडित रहावी या उद्देशाने सर्व पालख्यांसमवेत आलेल्या भाविकांनी नियमांचे पालन केले. एकादशीला स्नान, नगरप्रदक्षिणा केली. आपापल्या मठात भजन-कीर्तन करून विठू चरणी सेवा केली.

Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

द्वादशीला म्हणजेच बुधवारी सर्व पालख्यांनी ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीने थर्मल चाचणी, सॅनिटायझरची फवारणी आदी उपाय योजना केल्या होत्या. त्यानंतर ज्या एस. टी. बसने पंढरीला आले होते. ती बस परतीच्या प्रवासाठी जाताना फुलांनी सजवली होती. सर्वात पहिल्यांदा संत मुक्ताईची पालखी निघाली. यंदा पोलीस विभागाने सहकार्य केल्याची भावना सोहळा प्रमुख रवींद्र पाटील यांनी बोलून दाखवली. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर, संत तुकारम आदी संतांनी पंढरीचा निरोप घेतला. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ असे म्हणत आणि मंदिराच्या दिशेने हात जोडत हरिनामाच्या जयघोषात पालख्या गावी परतल्या.