राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारकडून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांसमोरच मोठी घोषणा, हात जोडून म्हणाले “मी लवकरच…”

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

काय म्हणाले अजित पवार?

“शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून कशाही पद्धतीने वागायला लागले आहे. कशापद्धतीने निर्णय घेणं सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाच्या परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्हाला त्यावर काहीही बोलयाचे नाही. महाराष्ट्रातील जन सुज्ञ आहे. आता जनतेनेच यांचा कारभार कशापद्धतीने चालला आहे आणि किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं जात आहे, याचा विचार आता जनतेनेच करावा”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”

बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत

एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांचे पगार, एसटीसाठीच्या उपाय योजना, सातवा आयोग, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.