अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपाने याच मतदारसघातून लोकसभेचे तिकीट दिलं आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेशदेखील केला. मात्र, नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे. “नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती हा पक्ष एनडीएतील (महाराष्ट्रात महायुती) घटकपक्ष आहे. या घटकपक्षाच्या विरोधाला न जुमानता भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीत आमची भाजपाच्या उमेदवाराशी मैत्रीपूर्ण लढत असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पाठोपाठ बच्चू कडू आता अमरावतीत नवनीत राणांविरोधात प्रचार करू लागले आहेत.

बच्चू कडू यांनी नुकत्याच एका प्रचारसभेत केलेल्या भाषणात दावा केला आहे की, खासदार नवनीत राणा यांनी मतदारसंघातील मतदारांना १७ रुपये किंमतीच्या साड्या वाटल्या. परंतु, या साड्यांमुळे येथील लोकांचं मतपरिवर्तन होणार नाही.

अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले, पैसा आईची सेवा करू शकत नाही. त्यासाठी चांगलं अंतर्मन तयार झालं पाहिजे, चांगले विचार पाहिजेत. त्यांनी (नवनीत कौर राणा) १७ रुपयांची साडी देऊन या मेळघाटची बेईज्जती करून टाकली. दोन कोटी रुपयांच्या कारने फिरायचं आणि १७ रुपयांची साडी देऊन लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु, मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला ही व्यवस्था तोडून टाकावी लागेल. त्यासाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल.

हे ही वाचा >> यवतमाळ : लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने पोतं भरून आणली चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत झालेल्या निर्णयांबाबत आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्हाला काहींचा निरोप होता की तटस्थ राहायचं, न इधर, ना उधर… परंतु, मला सांगायचं आहे की, निवडणुकीच्या वेळी वाटलेली १७ रुपयांची साडी लोकांचं मतपरिवर्तन करू शकत नाही. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास आहे. आपल्या छत्रपतींनी अनेक आव्हानं तोडून, मोडून परतवून लावली होती. हा संत गाडगेबाबांचा जिल्हा आहे. इथले लोक १७ रुपयांच्या साडीमुळे गुलामीकडे जाणार नाहीत.