राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध हटवण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं आहे. "करोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी अनेक अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या. त्याअंतर्गतच राज्यातंर्गत प्रवासावरही बंदी घातलेली. मात्र या काळात संपूर्ण अर्थचक्र थांबल्याने समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसलेला. आता परिस्थिती हळूहळू सावरत असताना केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी राज्यातंर्गत प्रवासावरील बंदी हटवण्याच्या सूचना दिलेल्या असूनही राज्य सरकारने याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही. राज्यांतर्गत प्रवास बंदी, ई पास या अटीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे," असं भांडारी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. आणखी वाचा- १ सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध कायम, मुख्यमंत्र्याचे संकेत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध तातडीने उठवावेत, ई पास पूर्णपणे बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks यांना सविस्तर निवेदन पाठविले आहे. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/WIe2id6JOV — Madhav Bhandari (@Madhavbhandari_) August 25, 2020 आणखी वाचा- “गद्दार महाराष्ट्र भाजपा, बॅन केलेल्या चिनी अॅपचा करतेय वापर”; काँग्रेसने दिला पुरावा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध ताबडतोब उठवावेत, ई पास पूर्णपणे बंद करावा, स्थानिक प्रशासनाला याबाबतीत दिलेले अधिकार काढून घ्यावेत, राज्यातील शेतकरी व छोटे उद्योजक यांचे व्यवहार सुरू करण्यासाठी मदतीच्या योजना राबवाव्यात व ते नीट चालावेत यासाठी भ्रष्टाचार रोखण्याला प्राधान्य द्यावे अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.