लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘चारसौ पार’ चा नारा दिला आहे. परंतु त्यामागे देशाची राज्य घटना पार बदलून टाकण्याचा आणि देशाची संपूर्ण लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

आणखी वाचा-उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणच्या प्रचार सभांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या स्थानिक विकास प्रश्नांसह देशातील विविध जटील प्रश्नांवर भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, भाजपचा यंदा लोकसभा निवडणुकीत चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. परंतु एवढ्या प्रचंड बहुमताने देशाचा विकास करायचा नाही. तर देशातील लोकशाही समूळ नष्ट करून संविधान पूर्णतः बदलून स्वतःची व्यवस्था भाजपला आणायची आहे. हा इरादा आपण कोणी बोलून दाखवत नाही तर खुद्द भाजपचेचे नेते बोलून दाखवत आहेत. कर्नाटकातील भाजपचे नेते अनंतकुमार आणि अन्य काही नेत्यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देत प्रणिती शिंदे यांनी, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भूलथापांना बळी पडून त्यांना साथ दिली तर संविधान बदलून टाकण्याचे आणि लोकशाही व्यवस्था समूष्ट नष्ट करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होईल, असा इशारा दिला.