|| रवींद्र जुनारकर

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात जापनीज मेंदूज्वरामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बाराही मृतांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले असता त्यातील ८ जणांना जापनीज मेंदूज्वर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहारमध्ये चमकी मेंदूज्वराने शेकडो मुलांचे बळी गेल्याचे प्रकरण गाजत असतानाच चंद्रपुरात जापनीज मेंदूज्वरामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांमध्ये घुग्घुस, चंद्रपूर, नागाळा, बोरी, विसापूर व गडचिरोली जिल्हय़ातील कमलापूर, अहेरी येथील रुग्णांचा समावेश असून ते दीड ते ३० वष्रे वयोगटातील आहेत. मेंदूज्वराचे संशयित रुग्ण म्हणून त्यांना येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान, सर्व १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवले असता त्यांना जापनीज मेंदूज्वर झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व मृत्यू जून महिन्यात झालेले आहेत. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी वरील घटनेस दुजोरा दिला. मुंबईतील आरोग्य विभागाच्या बैठकीत व्यस्त असल्याने रुग्णांची नावे देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.