विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटात असलेले अंबादास दानवे हे एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. असं झालं तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा धक्का असणार आहे यात शंका नाही. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा पार पडला. त्यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे. त्यामुळे अंबादास दानवे एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हटलं आहे संजय शिरसाट यांनी?

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की “अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. कधीही काहीही होऊ शकतं. अंबादासने मला सांगितलं बाई (सुषमा अंधारे)खूप डोक्याच्या वर झाली. राजकारणात तुम्ही असं काही समजू नका कधीही काहीही होऊ शकतं.” असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

सुषमा अंधारेंची नक्कल आणि टीका

आपल्या छोट्या भाषणात संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंची नक्कलही केली. “संदिपान भुमरे माझा भाऊ, हा माझा भाऊ, तो माझा भाऊ असं ही बाई (सुषमा अंधारे) बोलते. आम्ही ३८ वर्षे घालवली आहेत शिवसेनेत तू काल आली आहेस गं तू आम्हाला शिकवणार का? ” असं म्हणत नंतर संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे अंबादास दानवे शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सुषमा अंधारे यांचं पक्षातलं महत्त्व वाढत असल्याने दानवे नाराज आहेत असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार अल्यापासून ठाकरे गटाला गळती

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ४० आमदार आणि १३ खासदारांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. तर आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. मात्र ते आमदार कोण ही नावं सांगितली जात नव्हती. आज पहिल्यांदाच संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. अंबादास दानवे या सगळ्या प्रकरणावर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.