scorecardresearch

Premium

शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन कधी करणार? छत्रपती संभाजी राजे यांचा राज्य सरकारला सवाल

गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शासनाला त्यांचे संवर्धन करणे शक्य नसेल, तर ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या!

chhatrapati sambhaji raje on conservation of forts
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर शिवभक्तांनी गर्दी केली होती.

अलिबाग : शिवाजी महाराजांचे तीनशे गडकिल्ले त्यांची जिवंत स्मारके आहेत. त्यांच्या दगडा-दगडात इतिहास आहे. या गडाचे संवर्धन राज्य सरकार कधी करणार, असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केला.

गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शासनाला त्यांचे संवर्धन करणे शक्य नसेल, तर ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या! आम्ही शासनाचा एकही रुपया न घेता गडकिल्ल्यांचे संवर्धन करून दाखवतो, असे आव्हान त्यांनी दिले. ते तारखेनुसार ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ात बोलत होते.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले आहे. गडाच्या पायथ्याशी संपादित जागेवर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर प्रतापगड संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक चांगली बाब आहे. पण त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या ३०० गडकिल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडे गेली १० वर्षे पाठपुरावा सुरू आहे. पण त्याकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. तिनशे नको पण ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या, आम्ही विकास करून दाखवतो, असेही ते म्हणाले.

रायगडावर शिवभक्तांचा उत्साह

सोमवारी सायंकाळी शिरकाई पूजन आणि गड पूजनाने शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ास सुरुवात झाली. रात्री राज्यभरातून आलेल्या शाहिरांनी शिवमहिमा सांगणारे पोवाडे सादर केले. चाळीस पथकांनी गडावर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. मंगळवारी सकाळी ध्वजारोहणाने शिवराज्याभिषेक सोहळय़ाची सुरुवात झाली. वेदमंत्रोच्चाराच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर शिवराज्याभिषेक करण्यात आला. यावेळी ३५० सुवर्ण होनांचा अभिषेक करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळा पार पडला. राजसदरेपासून सुरू झालेल्या पालखी सोहळय़ाचा समारोप जगदीश्वर मंदिरात झाला. महाप्रसादाने सोहळय़ाची सांगता झाली. अवघा रायगड शिवभक्तांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 06:32 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×