माणसाचे नैसर्गिक आपत्तीपुढे काही चालत नाही. मात्र येणाऱ्या आपत्तीतून बोध घेण गरजेचे असते, त्याचा अभ्यास करून भविष्यात अशा आपत्ती उद्भवल्या तर त्यातून कमीतकमी जिवीत आणि वित्त हानी कशी होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. मात्र प्रशासकीय यंत्रणांना नेमका याचाच विसर पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पा अंतर्गत प्रस्तावित केलेली जवळपास चारशे कोंटीची कामे सध्या रखडली आहे. निसर्ग वादळानंतर ही कामे मार्गी लागणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती धोके निवारण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. चक्रीवादळाच्या परीस्थितीत लोकांचे सुरक्षित स्थळीस्थलांतरण करणे, जिवीत हानी रोखणे हा या प्रकल्पा मागचा मुळ उद्देश आहे. यात किनारपट्टीवरील भागात चक्रीवादळ निवारा शेडची उभारणी करणे, भूमिगत वीज वाहिन्या टाकणे आणि खारबंदीस्तीची कामे करणे यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या कामांसाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत रायगड जिल्ह्यात ४०० कोटींहून अधिक रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र ही कामे प्रशासकीय उदासिनते आभावी रखडली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Completes two years of nisarga cyclone hurricane hazard mitigation project works on paper abn
First published on: 03-06-2022 at 13:16 IST