काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येऊन तिघांनी मिळून ठरलेलं धोरण सांगत असताना यांच्या स्वतंत्र मुलाखती वेगळं दर्शवत आहेत. असं माझं निरीक्षण आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ऑल इज नॉट वेल आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपावरही भास्कर जाधव यांची टीका

भाजपा ही एकेकाळी सभ्य पार्टी होती. आता मात्र ती बेछूट आरोप करणारी पार्टी झाली आहे. आमच्या पक्षात फूट पडण्याला तेच जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे मात्र या लोकांना तोंड देत आहेत. आत्ता पर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वज्रमूठ सभा झाल्या. तर चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. यात जो धोरणात्मक निर्णय झाला त्यापेक्षा नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आपल्या मुलाखती देताना घेतलेली भूमिका वेगळी आहे. हे लोक संभ्रम निर्माण करु पाहात आहेत असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress and ncp creating confusion on mva said thackeray group leader bhaskar jadhav scj
First published on: 17-05-2023 at 13:15 IST